
पुणे – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर १५ एप्रिलला पहाटे ४ वाजता एका खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनुमाने २५ जण घायाळ झाले.घायाळ झालेल्यांना खोपोलीतील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट हे पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याहून परत येतांना या वादक गटाच्या बसचा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठा अपघात झाला. ही बस शिंगरोबा मंदिराच्या अलीकडील घाटात दरीत कोसळली. वाहनचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला असल्याची शक्यता आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांचे, तर मुख्यमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
या अपघाताविषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली, तसेच कामोठे येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. यासह त्यांनी या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे साहाय्य, तर घायाळांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’