वर्धा येथे भटक्या कुत्र्यांच्या गोठ्यावरील आक्रमणात कालवडीचा मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्धा – जिल्ह्यातील करंजी येथील डॉ. प्रकाश नागपुरे यांच्या शेतात गुरांसाठी गोठा बांधण्यात आला आहे. १३ एप्रिलच्या रात्री १२ वाजता ६ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने गोठ्यावर आक्रमण केले. यामध्ये कुत्र्यांनी कालवडीचे लचके तोडले. त्यात तिचा मृत्यू झाला. या वेळी शेतातील काहींनी आरडाओरड केली. त्यामुळे कुत्री पळून गेली.