यशवंतगडाच्‍या रक्षणासाठी चालू असलेल्‍या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्‍जास्‍पद !

‘राज्‍य संरक्षित स्‍मारक असलेल्‍या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील यशवंतगडाच्‍या तटबंदीला लागून अवैधरित्‍या करण्‍यात आलेले उत्‍खनन आणि काँक्रीटचे बांधकाम याला उत्तरदायी असलेल्‍या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्‍टाचार निवारण संस्‍थेचे कोकण प्रांताचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजन बापू रेडकर अन् भूषण विलास मांजरेकर, तसेच त्‍यांचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी गडाच्‍या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला.’ (२२.२.२०२३) (हे आंदोलन अजूनही चालू आहे.)