पोलीस नव्हे, तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गरबा मंडपात मुसलमान तरुणांना केला विरोध !

‘उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कालिदास अकादमी संकुलात १ ऑक्टोबर २०२२ च्या रात्री ११ च्या सुमारास गरबा कार्यक्रमामध्ये घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोपले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात नेले; मात्र ‘पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता रात्रीच तिन्ही तरुणांना सोडून दिले’, असे सांगण्यात येत आहे.’