
मुंबई – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मुंबई येथील ‘अधीश’ बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. ‘तुम्हाला अधिकाधिक २ मासांची मुदत देता येईल. या कालावधीत तुम्ही स्वत: हे बांधकाम काढा. नियमानुसार केले नाही, तर पुढील कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेला मुभा असेल’, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नारायण राणे यांनी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज केला होता; मात्र सर्वाेच्च न्यायालयाने राणे यांचा अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पिठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. त्यांच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत पालट केल्याची, अतिरिक्त बांधकाम केल्याची, तसेच सी.आर्.झेड. नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री