पूर आणि महागाई यांचा परिणाम !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये आलेल्या पुरामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भाव गगनाला भीडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री यांनी दिली आहे. तसेच ‘भारतासमवेत व्यवसाय चालू करण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत’, असेही ते म्हणाले. यापूर्वी लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनीही सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकतो, असे म्हटले होते. मार्च २०२१ मध्ये, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने अटारी सीमेवरून भारतातून साखर आणि कापूस आयात करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र काही दिवसांतच तेथील राजकीय पक्षांनी विरोध केल्याने हा निर्णय रहित करण्यात आला.
Pakistan to resume trade (open trade route) with India; Pakistan Finance Minister Miftah Ismail announced, “We will open trade route with India because of this flood & food price hike”: Pakistan media
— ANI (@ANI) August 29, 2022
संपादकीय भूमिका
|
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव