तक्रारीवर कारवाई करण्याची मुख्य सचिवांना सूचना

पणजी, १३ जून (वार्ता.) – ‘गोवंश रक्षा अभियान’चे श्री. हनुमंत परब यांना पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून नोंद घेण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर कारवाई करून माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे.
(सौजन्य : Herald TV)
११ मार्च २०२२ या दिवशी पिसुर्ले गावातून होणार्या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता. या वेळी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी श्री. हनुमंत परब यांना पोलीस ठाण्यात नेऊन तेथे अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेविषयी पोलीस तक्रार होऊनही, तसेच पोलीस महासंचालकांनी या घटनेविषयी अन्वेषण करण्याचे आदेश देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईची ३ मास वाट पाहिल्यनंतर श्री. हनुमंत परब यांनी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यासाठी सत्तरी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, तसेच याविषयी १९ मे या दिवशी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते.
बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल