‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन’ हे ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे. आगामी काळात हे क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. त्याची महती गायली जाईल; पण ‘गुरुदेवांनी याचे आयोजन का केले आणि आता हिंदूंनी कृतज्ञता म्हणून तरी काय करायला हवे ?’, असा विचार करतांना सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

प्रतिवर्षी होई इथे एक ज्ञानसोहळा ।
जणू वैकुंठलोकीचा हा कुंभमेळा ।। १ ।।

शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू ।
भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा ।
म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।। २ ।।
निद्रिस्त हिंदूंनो, कृपा ही भगवंताची जाणा रे ।
नियोजन केले आहे श्रीकृष्णानेच हो सारे ।
तुमच्याचसाठी जमले संत, सज्जन पहा रे ।। ३ ।।
द्वापरयुगी गोप-गोपींनी लावली होती काठी गोवर्धनाला ।
केवळ एवढेच तर करायचे आहे या कलियुगी तुम्हाला ।। ४ ।।
झटका आता त्या जन्मोजन्मीच्या निद्रिस्तपणाला ।
आणि परिधान करा उत्साहाने नवचैतन्याला ।। ५ ।।
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती शिंदे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०१८)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !