३२ वर्षे काहीही न करणाऱ्यांनी ‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे’, असे बोलणे हा केवळ देखावाच आहे !

काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला एका मुख्यमंत्र्यांनी खोटे म्हणणे, हे लोकशाहीला अशोभनीय !

‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे’, अशी सारवासारव देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी देहलीच्या विधानसभेत बोलतांना ‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झाल्याचे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात खोटेच दाखवण्यात आले आहे’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हे बोलतांना ते हसतही होते. यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांवरून टीका झाल्यानंतर त्यांनी वरील प्रकारे सारवासारव केली.’