|

कोलकाता (बंगाल) – केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय अन्वेषण यंत्रणांद्वारे विरोधी पक्षांवर अन्याय करत आहे, अशा भूमिकेतून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रात लिहिले आहे की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर सूड उगवण्यासाठी, देशभरातील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी, छळण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून भाजपला केंद्रीय संस्थांचा अपवापर करण्यापासून रोखले पाहिजे. आपण सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एका ठिकाणी एकत्र येऊन चर्चा करावी.
२. ममता बॅनर्जी यांनी पुढे असेही म्हटले, ‘माझा मनात न्यायव्यवस्थेविषयी सर्वोच्च आदर आहे; मात्र सध्या काही राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे लोकांना न्याय मिळत नाही. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि जनता हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे स्तंभ आहेत अन् कोणत्याही भागाला तडा गेला, तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडते.’
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !