देशात रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत असल्याचा दावा

नवी देहली – बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून या सूत्रावर केंद्र सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
बात फैलाई जा रही है या इधर-उधर हो रही है कि अब मोदी सरकार रेलवे का निजीकरण करने की योजना बना रही है।इसे राज्यों में रोजगार भर्ती परीक्षाओं को बार-बार रद्द करने के साथ जोड़ा जा रहा है। मैं सरकार को अपनी स्थिति स्पष्ट करने की चेतावनी देता हूं ,अन्यथा युवाओ द्वारा दंगे अपरिहार्य हैं
— Subramanian Swamy (@Swamy39) January 28, 2022
डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, ‘आता मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करण्याचा विचार करत आहे’, अशी चर्चा जाणूनबुजून पसरवली जात आहे किंवा ती केली जात आहे. याचा संबंध राज्यांमधील रेल्वे भरती परीक्षा वारंवार रहित करण्याशी जोडला जात आहे. सरकारने सतर्क होऊन यासंदर्भात आताच त्याची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा तरुणांचा उद्रेक होईल.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !