देशात रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत असल्याचा दावा

नवी देहली – बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून या सूत्रावर केंद्र सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
बात फैलाई जा रही है या इधर-उधर हो रही है कि अब मोदी सरकार रेलवे का निजीकरण करने की योजना बना रही है।इसे राज्यों में रोजगार भर्ती परीक्षाओं को बार-बार रद्द करने के साथ जोड़ा जा रहा है। मैं सरकार को अपनी स्थिति स्पष्ट करने की चेतावनी देता हूं ,अन्यथा युवाओ द्वारा दंगे अपरिहार्य हैं
— Subramanian Swamy (@Swamy39) January 28, 2022
डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे की, ‘आता मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करण्याचा विचार करत आहे’, अशी चर्चा जाणूनबुजून पसरवली जात आहे किंवा ती केली जात आहे. याचा संबंध राज्यांमधील रेल्वे भरती परीक्षा वारंवार रहित करण्याशी जोडला जात आहे. सरकारने सतर्क होऊन यासंदर्भात आताच त्याची भूमिका स्पष्ट करावी अन्यथा तरुणांचा उद्रेक होईल.
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !