
पुणे – संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानवकल्याणासाठी या विचारांचा प्रसार संपूर्ण विश्वात व्हावा, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली. pic.twitter.com/Cisv8RPvro
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 29, 2021
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !