
सांगली, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगलीच्या आयर्विन पुलास १८ नोव्हेंबर या दिवशी ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. या पुलाचे काम वर्ष १९२७ ते १९२९ पर्यंत चालू होते. या पुलास एकूण १३ कमानी असून त्याच्या बांधकामासाठी ६ लाख ५० सहस्र रुपये व्यय आला आहे. पुलाची योजना आणि कामाची पहाणी व्ही.जी. भावे यांच्याकडे होती. याचे उद्घाटन तत्कालीन ‘व्हॉइस रॉय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया’चे आयर्विन यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १९२९ या दिवशी झाले. सांगलीत त्या काळी ‘हीज हायनेस’ श्रीमंत चिंतामणराव धुंडिराज उपाख्य आप्पासाहेब पटवर्धन यांची कारकीर्द होती. वर्ष २००५, वर्ष २०१९ आणि २०२१ च्या महापुराचा अनुभव या पुलाने घेतला असून आजही हा पूल कृष्णा नदीत ठामपणे उभा आहे, अशी माहिती ज्येष्ठ राष्ट्रप्रेमी श्री. शरद फडके यांनी दिली आहे.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर