पुणे – गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बनावट कागदपत्र वापरून भूमी मिळवून देणार्या टोळीला गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि खडकी न्यायालय यांच्या आवारात मिळून एकूण १० जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र आणि रबरी शिक्के इत्यादी साहित्य शासनाधीन केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेतील उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून १० जणांना कह्यात घेतले. पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार या सर्वांनी मिळून ही कारवाई केली.अधिकारी
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > बनावट कागदपत्रे वापरून भूमी मिळवून देणारी टोळी गुन्हे शाखेच्या कह्यात !
बनावट कागदपत्रे वापरून भूमी मिळवून देणारी टोळी गुन्हे शाखेच्या कह्यात !
नूतन लेख
- हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी भारताची केली धर्मशाळा !
- कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
- नेहा हिरेमठच्या मारेकर्याला फाशी झाली पाहिजे !
- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !
- श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !
- ‘डिपफेक’ विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करा ! – महाराष्ट्र पोलीस