देहलीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांचा आरोप
कुठल्याही गोष्टीचे राजकीय भांडवल केले नाही, तर ते राजकारणी कसले ?

नवी देहली – राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला, असा आरोप देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.
#BJP made people burst firecrackers on #Diwali; farm fires added to deteriorating air quality: Gopal Raihttps://t.co/zV0hVOpYPA
— FinancialXpress (@FinancialXpress) November 5, 2021
ते पुढे म्हणाले, ‘‘प्रदूषणाचा स्तर हा आणखी एका घटनेमुळे वाढला आहे. देहलीची शेजारी राज्ये असलेल्या पंजाब आणि हरियाणा येथे शेतीची कामे लांबली आहेत. पीक काढून झाल्यावर पुढील पीक घेण्याआधी उरलेला पिकांचा अनावश्यक भाग जाळला जातो. सध्या ही कामे जोरात चालू आहेत. त्यामुळेही निर्माण झालेला धूर देहलीच्या वातावरणात पसरून प्रदूषण वाढले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !