भयभीत झालेल्या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी
|

देहली – दक्षिण देहलीच्या बटुकेश्वर (बी.के.) दत्त कॉलनीमध्ये १४ ऑक्टोबरच्या दिवशी धर्मांधांच्या एका धार्मिक मिरवणुकीच्या वेळी त्यांनी देहली पोलिसांशी घातलेल्या वादानंतर हिंसाचार केला. या वेळी पोलिसांनी लावलेले अडथळे (बॅरेकेड्स) तोडून टाकले. या संदर्भातील एक व्हिडिओ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील यादव यांनी ट्वीट केला आहे. त्यांनी ‘या घटनेमुळे स्थानिक हिंदू घाबरलेले असून त्यांना संरक्षण पुरवावे’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. याविषयी यादव यांनी ‘#SaveBKDuttPeoples’ नावाने ‘हॅशटॅग ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
सुनील यादव यांनी सांगितले की, बी.के. दत्त कॉलनी फाळणीच्या वेळी पाकमधून भारतात आलेल्या हिंदूंसाठी वसवण्यात आली होती. येथे पूर्वी मुसलमानांची ४ घरे होती, आता ती ४० हून अधिक घरे झाली आहेत. ती कशी झाली ?, हे कुणालाही ठाऊक नाही. येथे हिंसाचाराच्या वेळी धर्मांधांकडून महिलांना जाणीवपूर्वक पुढे करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये बाहेरून लोक आली होती. प्रतिवर्षी अशा मिरवणुकीच्या वेळी हिंसाचार होतो. (जर प्रतिवर्षी येथे हिंसाचार होतो, तर पोलीस काय करत असतात ? ते हा हिंसाचार रोखू शकत नसतील, तर ते सामन्य जनतेचे रक्षण कसे करणार ? – संपादक)
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’