
मिरज, ३ ऑक्टोबर – मिरजेत सांगली महापालिकेकडून ‘आझादीका अमृतमहोत्सव’ कार्यक्रम पार पडला. या वेळी शाहीर देवानंद माळी यांनी त्यांच्या पथकासह देशाच्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारित पोवाडा सादर केला. या निमित्ताने बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती-संस्था यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती निरंजन आवटी, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा पाटणकर, उपायुक्त चंद्रकांत आडके, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक डॉ. रवींद्र ताटे यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !