गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना निर्बंधातून सवलत नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

जालना – ‘गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना दळणवळण बंदीच्या निर्बंधातून सवलत देण्यात आलेली नाही. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे. सर्व निर्णय विचार करून घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावे’, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३० ऑगस्टला पत्रकारांशी बोलतांना केले. ‘चाकरमान्यांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीचे २ डोस अनिवार्य करण्यात आले आहेत’, असेही त्यांनी सांगितले.