
पणजी – शिरगाव (डिचोली) येथील खाणमातीमुळे लागवडीसाठी निरुपयोगी झालेली ३० हेक्टर शेतभूमी पुन्हा लागवडयोग्य स्थितीला आणली आहे, अशी माहिती शासनाच्या जलस्रोत खात्याने उच्च न्यायालयात दिली. याविषयी शिरगावच्या ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
जलस्रोत खात्याने याविषयी एक अहवालच उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत खाण प्रभावित गावांमध्ये ४ कोटी ४ लाख रुपयांचे पर्यावरण पुनर्वसन काम तेथील खाण आस्थापनांच्या साहाय्याने हाती घेण्यात आले आहे. खाणमातीमुळे लागवडीसाठी निरुपयोगी झालेली शेतभूमी पूर्वस्थितीला आणणे, नद्यांच्या पात्रांमधील गाळ काढणे, शेतभूमीतील झुडपे काढणे आदी कामे पुणे येथील ‘अभिनंदन बिल्डकॉम’ या आस्थापनाने केली असून यासाठी त्यांना आतापर्यंत १ कोटी ६७ लाख रुपये देण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे या कामाला विलंब झाला असून आता मार्च २०२२ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
शिरगाव येथील नदीतील ३.७३ कि.मी. एकूण लांबीपैकी २.५१७ कि.मी. लांबीचे म्हणजेच ६७.४ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. ७० हेक्टर शेतभूमीपैकी ३० हेक्टर शेतभूमीतील खनिज मातीचा गाळ काढण्यात आला असून हे क्षेत्रफळ लागवडयोग्य बनले आहे. उर्वरित ४० हेक्टर शेतभूमी पूर्वस्थितीला आणण्याचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
योग हा गोमंतकियांच्या जीवनाचा भाग व्हायला हवा ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री