अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून खड्डे बुजवण्यामध्ये पुढाकार का घेत नाही ? – संपादक

सातारा, २१ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकवेळा चेतावणी, निवेदने देऊनही पथकरनाका प्रशासन महामार्गावरील खड्डे बुजवत नाही; मात्र पथकरामध्ये वेळोवेळी वृद्धी करत आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत पथकरनाके बंद करण्यात यावेत, अशी मागणी सातारावासियांकडून केली जात आहे.
पथकरनाका बंद करण्याविषयी सातारावासीय एकत्र येत आहेत. मध्यंतरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारावासियांचे नेतृत्व करत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते; मात्र यावर पुढे काहीच झाले नाही. महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, तसेच सातारावासियांसाठी जिल्ह्याच्या सीमेतील तासवडे आणि आनेवाडी पथकरनाके पथकरमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी सातारावासीय करत आहेत. सातारावासियांच्या या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत आहेत.
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !