अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे ! – संपादक

नवी देहली – राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. या एकूण गोंधळावरून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले.
राज्यसभा में हंगामा, भावुक हुए वेंकैया नायडू
देखिए #हल्ला_बोल @anjanaomkashyap के साथ pic.twitter.com/2GvIJQK3bT— AajTak (@aajtak) August 11, 2021
याविषयी ११ ऑगस्टला सभागृहात बोलतांना नायडू म्हणाले की, सभागृहात जे काही झाले, ते पुष्कळ वाईट घडले. लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. संसदेतील काही खासदारांनी मोकळ्या जागेमध्ये, तसेच बाकावर उभे राहून पुस्तिका भिरकावल्या. हे सर्व दृश्य पाहून मला रात्रभर झोप आली नाही. काही सदस्यांनी सभागृहाचे अपवित्र चित्रीकरण केले आणि सामाजिक माध्यमांत छायाचित्रे प्रसारित केली. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग होते, हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. आक्रामक म्हणून स्वत:ला सादर करण्याच्या काही सदस्यांधील स्पर्धेचा हा परिणाम आहे.
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !