दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचा मृत्यू

सातारा, २५ जुलै (वार्ता.) – वाई तालुक्यातील देवरूखवाडी-कोंढावळे येथे मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आई आणि मुलगी यांचा अंत झाला. तसेच २ जणांना गंभीर दुखापत झाली असून ३ म्हशी आणि ४ रेडके ढिगार्याखाली दबले जाऊन मृत्युमुखी पडले आहेत.
२४ जुलै या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी ७ वाजता डोंगरकडा कोसळून ८ ते १० घरे मातीच्या ढिगार्याखाली दबली गेली. १७ ते १८ घरांची वस्ती असलेल्या या गावात डोंगरकडा कोसळतांना स्थानिकांनी आरडाओरडा केला; मात्र राहीबाई कोंढाळकर (वय ८० वर्षे) आणि त्यांची मुलगी भीमाबाई वाशिवले (वय ६२ वर्षे) यांना आवाज ऐकू न आल्याने त्या दोघी घरातच थांबल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाहेर पडलेले २० ते २५ जण वाचले. अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला. घटना सायंकाळी घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. माती, मुसळधार पाऊस, तुटलेले रस्ते, चिखल, खंडित झालेला वीजपुरवठा यांमुळे सहाय्यात अडथळे येत होते.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !