अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

सातारा, १६ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात दुधात भेसळ करणार्या दूध संघांवर अन्न आणि भेसळ विभागाने कारवाई करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई करण्यात टाळाटाळ केल्यास साहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि साहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांचा सकस आहार म्हणून ओळखल्या जाणार्या दुधात प्रचंड प्रमाणात भेसळ केली जात आहे. यामध्ये युरिया, पामतेल, मेलामाईनसारखे विषारी रसायन मिसळून सामान्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. राज्य सरकारने कायद्यामध्ये पालट करून प्रशासन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात दूध आणि अन्न यांमध्ये भेसळ झाल्यास संबंधित अन्न-भेसळ अधिकार्यांवर उत्तरदायित्व निश्चित करावे. त्यामुळे भेसळ करणार्यांवर अंकुश ठेवता येईल.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे