मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरे चैतन्य आणि आनंद यांचा स्रोत आहेतच; पण या व्यतिरिक्त धर्मसंस्थापनेतही मंदिरांचा भरीव वाटा आहे. त्यामुळे मंदिरावर होणार्‍या आघातांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.