
माळशिरस (जिल्हा सोलापूर) – शहरातील बसस्थानकासमोरील ९ दुकानांना २८ मार्चच्या पहाटे आग लागली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांना पंचनामा करून हानीग्रस्तांना अधिकाधिक साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखाना आणि यशवंतनगर येथील शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांच्या अग्नीशामक बंबांनी ही आग सकाळी आटोक्यात आणली. माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असणारे शहर असल्याने येथे अग्नीशामक बंब असणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘प्रशासनाने अग्नीशामक बंब त्वरित घ्यावा’, अशी मागणी नागरिक करत आहेत. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण