१६.७.२०२० या दिवशीच्या भाववृद्धी सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरूंची महती वर्णन करतांना सांगितले, गुरूंची शिष्यावर एवढी कृपा असते की, शिष्य कुठेही, कधीही आणि कसल्याही संकटात सापडला, तरी ते त्याचे रक्षण करण्यास त्वरित प्रकट होतात. हे ऐकल्यावर मला वर्ष १९९८ मध्ये मी कुडाळ सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत असतांनाचा एक प्रसंग आठवला.

१. रात्री खोलीच्या बाहेर उघड्यावर झोपलो असतांना सकाळी जाग आल्यावर अंथरुणाची घडी करत असतांना उशीखाली अंदाजे बोटभर जाडीचे आणि ८ – ९ इंच लांबीचे एक विषारी फुरसे मरून पडलेले आढळणे अन् ते काही वेळापूर्वीच उशीखाली आले असावे, असे वाटणे
कै. रंजन देसाई यांनी त्यांची लहानशी खोली सनातन संस्थेला कार्यालय म्हणून उपलब्ध करून दिली होती. त्या खोलीत आवश्यक ते साहित्य असल्याने तेथे वावरायला फारशी मोकळी जागा नव्हती. मी त्या खोलीत रात्रं-दिवस असायचोे. खोलीला केवळ एकच दार असून खिडकी नव्हती आणि पंखाही नव्हता. ती खोली कारखान्याच्या भट्टीला लागूनच असल्याने त्या बाजूची भिंतही तापत असे. उन्हाळ्यात खोलीत पुष्कळ गरम व्हायचे. मी रात्री दाराच्या बाहेर अंथरूण घालून उघड्यावरच झोपत असे. दारासमोरची वाट खडबडीत होती. सभोवताली रानगवत आणि काटेरी झुडपे होती. समोर १० ते १२ फुटांवर कुंपण आणि त्या पलीकडे रहदारीचा डांबरी मार्ग होता.
एकदा सकाळी मला ५.३० वाजता जाग येऊन मी अंथरुणाची घडी करत असतांना उशीखाली अनुमाने बोटभर जाडीचे आणि ८ – ९ इंच लांबीचे एक विषारी फुरसे मरून पडले आहे, असे मला दिसले. त्याचे तोंड ठेचलेले, ताज्या रक्ताने माखलेले होते. रक्त ताजे दिसत असल्यामुळे ते काही वेळापूर्वीच उशीखाली आले असावेे, असे वाटले.
२. त्या फुरशाचे डोके ठेचून त्याला यमसदनी पाठवणारे कोण असावेत ? मला त्याच्या दंशापासून वाचवणारे कोण असेल ? ती माझी गुरुमाऊलीच होती ना ! या प्रसंगातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या बोलण्यातील सत्यता पटते. मी ती प्रत्यक्ष अनुभवली आहे.
फुरशाने दंश केलेल्या व्यक्तीला काही घंट्यांत (२ – ३ घंट्यांत) उपचार न मिळाल्यास ती जगत नाही, असे म्हणतात. माझ्या आत्याच्या मुलाचा (वय २० ते २२ वर्षे) असाच फुरशाच्या दंशाने वेळीच उपाय न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.८.२०२०)
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !