
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९ फेब्रुवारी अर्थात् शिवजयंतीदिनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. १०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रतिवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र या वर्षी कोरोनामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदींचे सादरीकरण करण्यात येऊ नये. तसेच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत. कोणत्याही प्रभात फेर्या, वाहन फेर्या, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात यावा. सामाजिक अंतर ठेवून हा उत्सव साजरा करावा.
‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !