हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे फेरीद्वारे मागणी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २८ जानेवारी (वार्ता.) – उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करावे आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे, या मागण्यांसाठी येथे हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, संजय सोनवणे, परीक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे, गिरीश लोहारेकर, अर्जुन साळुंके, सुधीर परमेश्वर, दिनेश पलंगे, जिओत्तम जेवळीकर, शिवराज जाधव, दिनेश धनके आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊनही सरकारने नोंद न घेतल्यामुळे पुन्हा निवेदन द्यावे लागत आहे, असे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. आता या निवेदनाची नोंद न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !