हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे फेरीद्वारे मागणी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २८ जानेवारी (वार्ता.) – उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करावे आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे, या मागण्यांसाठी येथे हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, संजय सोनवणे, परीक्षित साळुंके, सुदर्शन वाघमारे, गिरीश लोहारेकर, अर्जुन साळुंके, सुधीर परमेश्वर, दिनेश पलंगे, जिओत्तम जेवळीकर, शिवराज जाधव, दिनेश धनके आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊनही सरकारने नोंद न घेतल्यामुळे पुन्हा निवेदन द्यावे लागत आहे, असे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. आता या निवेदनाची नोंद न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आली आहे.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !