(म्हणे) ‘महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती, तर बलात्कार टळला असता !’

राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला सदस्याचे दायित्वशून्य वक्तव्य !

  • कुठे रामराज्यात अंगावर सोन्याचे दागिने घालून मध्यरात्रीही घराबाहेर पडू शकणार्‍या महिला, तर कुठे महिलांना ‘सायंकाळीही घराबाहेर पडू नका’, असा फुकाचा सल्ला देणार्‍या कलियुगातील महिला आयोगाच्या महिला सदस्या !
  • उत्तरप्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण भारतात महिला सायंकाळी निर्धास्त फिरू शकतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरण करणार्‍या हिंदूंचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात मंदिराच्या एका पुजार्‍याचाही समावेश आहे. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर नोंद घेत आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांना पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पाठवले होते.

या वेळी चंद्रमुख देवी यांनी, ‘‘पीडित महिला कुणाच्या दबावाखाली असेल, तर तिने वेळ लक्षात घ्यायला हवी होती. उशिरा घराबाहेर जाणे टाळले पाहिजे होते. पीडित महिला संध्याकाळी एकटी घराबाहेर पडली नसती किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यासमवेत गेली असती, तर आज तिचे प्राण वाचले असते’’, असे संतापजनक विधान केले.

 (सौजन्य : India Today)

चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, ‘‘महिला त्यांच्या इच्छेने त्यांना वाटेल तेव्हा कधीही आणि कुठेही बाहेर फिरू शकतात.’’