|

चतरा (झारखंड) – येथील पितीज गावामध्ये कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा होत नसल्याने ‘भुतांचा त्रास होईल’, या भीतीमुळे लोकांनी उभे पिक कापण्याऐवजी तसेच सोडून दिल्याने ते नष्ट होत असल्याचे समोर आले आहे. (अशा वेळी आध्यात्मिक संघटनांनी गावकर्यांना साहाय्य करून तेथे कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा करून गावकर्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंमध्ये संघटितपणा नसल्याने आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने अशा घटना घडतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) सामाजिक कार्यकर्ते येथे गावकर्यांची अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गावकरी संजय यादव यांनी म्हटले की, गावातील काही जण अन्य एका संप्रदायावर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे गावकर्यांमध्ये एकता नाही. यातून कुलदेवता आणि ग्रामदेवता यांची पूजा होत नाही. त्यांची पूजा केल्याविना कापणी केली जाऊ शकत नाही. गावकर्यांमध्ये भीती आहे की, जर पूजा न करता कापणी केली आणि धान्य घरी नेले, तर भुतेही त्यांच्या घरी येऊन काही तरी अशुभ घडवू शकतील. अशा प्रकारच्या भीतीमुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३ वर्षे शेतीच करण्यात आली नव्हती.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त