
मुंबई – विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी केंद्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. २२ डिसेंबर या दिवशी न्यायमूर्ती आर्.डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. याविषयी न्यायालयाने केंद्रशासनाच्या ॲटर्नी जनरल यांना नोटीस पाठवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील आणि दिलीप आगळे यांनी या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका केली आहे. या याचिकेमध्ये राज्यपालनियुक्त १२ सदस्यांसाठी राज्यशासनाने पाठवलेल्या नावांतील काही नावांना आक्षेप नोंदवला आहे. राज्यघटनेनुसार राज्यपालनियुक्त सदस्यांमध्ये कला, साहित्य, सामाजिक आदी क्षेत्रांतील सदस्य असणे बंधनकारक आहे; मात्र या नियमाला डावलण्यात आले असल्याचे म्हटले आहे. यावरील पुढील सुनावणी १४ जानेवारी या दिवशी होणार आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !