India Withdraws Diplomats Families : भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना परत बोलवले !

बांगलादेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवरून भारत सरकारचा निर्णय

नवी देहली – बांगलादेशात गेल्या वर्षभरापासून हिंदूंवर आक्रमणे होऊन त्यांच्या हत्या होत आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशात संसदेची निवडणूक होणार आहे. ते पहाता भारत सरकारने सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेशात तैनात असलेल्या भारतीय अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही उच्चायुक्तालय आणि पदांवर असलेल्या आमच्या अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. भारताचे ढाका येथे उच्चायुक्तालय आहे आणि चटगाव, खुलना, राजशाही आणि सिलहट येथे इतर राजनैतिक कार्यालये आहेत.