संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी समर्पित करीन आणि साधूंची हत्या झालेल्या ठिकाणी हिंदु शक्तीपिठाची निर्मिती करणार, असा संकल्प वृंदावन धामचे हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी या वेळी केला.

ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न !

‘माऊली माऊली’, ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ या जयघोषात घंटानाद करत आणि समाधीवर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा पार पडला.

संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून मानवकल्याणासाठी आवश्यक ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी सापशिडीच्या माध्यमातून मोक्षपट उलगडणे !

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे.

संतांचे वागणे, आत्मज्ञानाचा अधिकार आणि स्थिरबुद्धी यांविषयी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील विवेचन

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥

मुलांची नावे ठेवतांना ‘विचार कसा असावा ?’, याचे आदर्श उदाहरण !

‘संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील एक उत्तम साधक होते. गुरूंच्या आज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. ‘गृहस्थाश्रमात राहूनही साधनामार्गावरील जीवनाचे ध्येय सतत त्यांच्या समोर राहील’, अशीच नावे त्यांनी त्यांच्या मुलांची ठेवली. त्यांनी ठेवलेल्या नावांमधून पुढील बोध होतो.

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे वाखरी (पंढरपूर) येथे आगमन !

विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलेल्या शिवशाही बसमधून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे रात्री वाखरीमध्ये आगमन झाले.

मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे प्रस्थान !

कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी यांच्या नियमांचे पालन करून मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान वीणा मंडपातून आजोळघरी झाले.

धर्मशिक्षणानेच ‘आत्महत्या’ रोखू शकतो !

भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही. 

आषाढीवारीसाठी संतांच्या पालख्या पायीच नेण्याची वारकर्‍यांची आग्रही मागणी !

श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यातील सर्व घटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. थोडक्या स्वरूपात का होईना, पायी वारी झाली पाहिजे, याविषयी आम्ही आग्रही आहोत.’’