
पिंपरी – कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी यांच्या नियमांचे पालन करून मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान वीणा मंडपातून आजोळघरी झाले. माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटे काकड आरती, पवमान अभिषेक आणि कीर्तन सेवा होऊन हरिनामाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले. माऊलींच्या पादुका १८ जुलैपर्यंत आळंदी येथे मुक्कामी रहाणार असून १९ जुलै या दिवशी विशेष बसने त्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण