आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास !
मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे आणि . . . शोधप्रबंध सादर केले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही वर्षांनी पालटत असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले