भारत पुन्हा ‘विश्‍वगुरु’ होण्यासाठी कशाची आवश्यकता ?

भारत पुन्हा ‘विश्‍वगुरु’ होण्यासाठी कशाची आवश्यकता ?

‘भारतात इतर काही आयात करण्यापेक्षा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते आयात करा. मग इतर काहीच आयात करावे लागणार नाही. भारत पुन्हा विश्‍वगुरु होईल आणि गतवैभव प्राप्त करील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, यासाठी प्रयत्न करा !

हिंदूंचे धर्मांतरच होऊ नये, यासाठी प्रयत्न करा !

‘धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्याचे कार्य करण्यापेक्षा ‘हिंदू धर्मांतरित होणार नाहीत’, हे कार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पैशाचा ‘त्याग’ अधिक सुलभ !

पैशाचा ‘त्याग’ अधिक सुलभ !

‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्‍चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मबंधनाचे महत्त्व !

धर्मबंधनाचे महत्त्व !

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मकार्यार्थ ईश्‍वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

धर्मकार्यार्थ ईश्‍वराचा आशीर्वाद कसा प्राप्त कराल ?

‘ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली, तर ईश्‍वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्‍वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी नाही, तर समष्टी साधनाच आवश्यक !

ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी नाही, तर समष्टी साधनाच आवश्यक !

‘ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, यासाठी कार्यरत असतो. हे त्याचे व्यष्टी नाही, तर समष्टी कार्य आहे. अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही समष्टी साधनाच (समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नरत रहाणे) करणे आवश्यक आहे.’

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले