विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा आहे ?

‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकून असणे

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील होणे आवश्यक !

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील होणे आवश्यक !

‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अधिवक्त्यांच्या अशा शिक्षणाचा काय उपयोग ?

अधिवक्त्यांच्या अशा शिक्षणाचा काय उपयोग ?

‘गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न करणारे अधिवक्ते असतात, म्हणजे त्यांना अधिवक्ता होण्याचे शिकवणार्‍या महाविद्यालयांत नैतिकतेचे मूलभूत सिद्धांत शिकवले जात नाहीत. अशा शिक्षणाचा काय उपयोग ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे श्रेष्ठत्व !

अन्य साधनामार्गांच्या तुलनेत भक्तीयोगाचे श्रेष्ठत्व !

ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीच्या तुलनेत भक्तीयोग हा प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा सोपा मार्ग आहे, उदा. देवपूजा, स्तोत्रपठण करणे, दैनंदिन कृती करतांना नामजप करणे. इत्यादींमुळे भक्तीयोगानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती होण्याचे प्रमाण अधिक असते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करणारे वास्तव !

‘चांगली बातमी आहे’, असा एक दिवस तरी हिंदू आणि भारत यांच्यासाठी आहे का ?’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्म बुद्धीपलीकडे आहे, हे ज्ञात नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

धर्म बुद्धीपलीकडे आहे, हे ज्ञात नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही; कारण धर्म बुद्धीच्या पलीकडचा आहे, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्याला बुद्धीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी कधी त्यांची मर्यादा जाणतील का ?

बुद्धीप्रामाण्यवादी कधी त्यांची मर्यादा जाणतील का ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना केवळ बुद्धीने कळलेल्या ज्ञानाचा अहंकार असणे, हे अल्प बुद्धी असलेल्या प्राण्यांनी ‘माणसापेक्षा आम्हाला अधिक कळते’, असे म्हणण्यासारखे आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे लक्षात घ्या !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे लक्षात घ्या !

‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !

सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !

‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्‍यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले