दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.