कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन

कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विदेशी पर्यटक रस्त्यावर फिरतांना आढळल्यास त्यांचे पारपत्र घेतले जाणार कह्यात !

येथे राज्य सरकारने दळणवळणबंदी घोषित केलेली असतांना काही विदेशी नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कौशल किशोर शर्मा यांनी विदेशी पर्यटकांसाठी एक कठोर निर्णय लागू केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत असतांनाही युरोप आणि अमेरिका येथील जनता करत होती मौजमजा !

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट…

चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या अचानक २ कोटींनी घटली

चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.

कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय होऊन जातो. ढोल-ताशे आदी वाद्यांचा गजर होतो; मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. आपणाला गुढीपाडवा अवश्य साजरा करायचा आहे. यंदा कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारूया

चिनी लोकांच्या वटवाघुळ खाण्याच्या सवयीमुळेच कोरोनाचा प्रसार !

१२ वर्षांपूर्वीच वैज्ञानिकांनी दिली होती चेतावणी
आसुरी सवयीमुळे आज जग विनाशाच्या खाईत लोटले जात आहे, हे आतातरी स्वतःला अधिक प्रगत समजणार्‍यांच्या लक्षात येईल का ?

भारतातील ७७ टक्के मुलींवर लैंगिक अत्याचार ! – युनिसेफ

भारतामध्ये १५ ते १९ वर्षे  वयोगटातील ७७ टक्के मुलींना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, अशी माहिती ‘दी युएन् चिल्ड्रेन्स फंड’ने (युनिसेफने) ‘हीडन इन प्लेन साईट’ या शीर्षकाच्या अहवालात दिली आहे.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.