पोलीसदल शारीरिक आणि मानसिक तणावात असल्याने त्यात पालट होईपर्यंत कायदा सुव्यवस्था चांगली रहाणे कठीण ! – मद्रास उच्च न्यायालय
पोलिसांची अशी स्थिती होण्याला आणि ती तशीच ठेवण्याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
पोलिसांची अशी स्थिती होण्याला आणि ती तशीच ठेवण्याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
न्यायालयाने फटकारण्यासह संबंधितांना कठोर शिक्षा करण्यास प्रारंभ केला, तर यात काही प्रमाणात तरी पालट होईल ! भारतात प्रशासनाचा कारभार कसा चालतो, यावर न्यायालयाने मार्मिक टिप्पणी केली आहे. असे प्रशासन जनहित काय साधणार ?
जिल्हा पंचायत निवडणूक जनतेवर लादली नाही, तर ती नियमानुसार योग्य वेळी घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन’ने (सी.सी.आय्.एम्.) पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्यांना शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिली आहे. या निर्णयाचे ‘गोवा आयुर्वेदिक मेडिकल असोसिएशन’ने स्वागत केले आहे.
शालेय मुलांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची सुलभ आणि उपयुक्त अशी संधी गोव्यात ‘संस्कृतभारती’कडून देववाणी परीक्षा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी कौस्तुभ कारखानीस, प्रकल्प संचालक, देववाणी संस्कृतभारती, ९८२३९४५०९४ यावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आलेे आहे.
रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली हिंदु देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची नोंद घेऊन काही धर्मप्रेमी हिंदू युवकांनी एकत्रित येऊन या सर्व प्रतिमा संकलित केल्या.
कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणार्या सर्व भिंती आम्ही पाडत आहोत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एफ्.आय.सी.सी.आय.च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
८ मासांमध्ये या उद्योगाची सुमारे १२ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी झाली असून वर्षाच्या शेवटी ती १६ सहस्र कोटी रुपयांपर्यंत जाईल ! यामुळे केंद्र सरकारने वृत्तपत्र उद्योगाला प्रोत्साहन पॅकेज द्यावे – इंडियन न्यूजपेपर सोसायटी
एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर यांची निवड करण्यात येऊ नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
कोेरोना महामारीच्या सावटाखाली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ डिसेंबर या दिवशी ५६.८२ मतदान झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५५ टक्के, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५८.४३ टक्के मतदान झाले.