इंद्रायणी नदीच्‍या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्‍या आरोग्‍याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादीकाँग्रेस

आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्‍ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्‍या लाखो वारकर्‍यांना हे दूषित पाणी प्‍यावे लागते.

आझाद मैदानावर आंदोलकांसाठी निवारा उभारण्‍याचे निर्देश !

आझाद मैदानावर आंदोलन करण्‍यासाठी राज्‍यभरातून आलेले आंदोलक भर पावसांत आंदोलन करतात; मात्र त्‍यांना निवारा नसल्‍याचे सांगितले. त्‍यावर अध्‍यक्षांनी वरील निर्देश दिले.

#Exclusive : श्री क्षेत्र आळंदी (पुणे) येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वच स्‍तरांवर अनास्‍था !

आळंदी आणि देहू हे लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान ! आळंदी हे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि देहूमध्‍ये जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचे तीर्थक्षेत्र ! लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली आळंदी येथील इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

…तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – विधानसभा अध्‍यक्ष

सभागृह चालू असतांना जो प्रश्‍न सार्वजनिक हिताचा असेल असेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्‍य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात.

पुणे येथील उच्‍चभ्रू घरातील तरुणांना नशेची सवय लावणारे ‘ड्रग्‍ज’चे रॅकेट उघडकीस !

आतंकवादी सापडणे, ‘ड्रग्‍ज’चे रॅकेट उघड होणे यावरून ‘असुरक्षित पुणे’ अशी पुण्‍याची प्रतिमा होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करणे आवश्‍यक !

‘बार्टी’च्या वतीने प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ देणार नाही ! – शंभूराज देसाई, मंत्री

प्रक्रियेमध्ये अनियमितता, सरकारची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करू, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती !

कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर अध्यात्म आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्‍यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.

कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट

२७ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जीवनातील सुखासाठी मातेचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ ! – प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी तपश्चर्येमधून प्राप्त केलेले आत्मज्ञान प्रसन्नपणे माताजींना प्रदान केले. अशा या माताजी आपल्या पुढ्यात श्रीरामकथेतील गूढ रहस्य ठेवत आहेत, हे आपल्या सर्वांच्या पूर्वसुकृताचेच फळ आहे.