
मुंबई – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) वतीने प्रशिक्षण देण्यासाठी ३० संस्थांची १ वर्षासाठी निवड केली होती. त्यांची निवड पुन्हा करता येत नाही; परंतु विद्यार्थ्यांची हानी होणार नाही, याची काळजी शासन घेईल. या प्रक्रियेमध्ये अनियमितता, सरकारची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करू, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधीमध्ये प्रश्न विचारला होता.
मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ज्या ३ संस्था बोगस आढळल्या. त्यांचे गुणांकन वाढवणे, त्यांना मान्यता देणे याविषयीच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्याची माहिती पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये पारदर्शकता येण्याकरता ई-निविदा प्रकिया चालू केली आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !