मोरगाव आणि सिद्धटेक येथील माघी यात्रेस प्रारंभ !

कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पालखीचे देव गाडीमधून मोरगावकडे प्रस्थान झाले आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी दिली आहे.

सासवड येथील १२ वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कारांचे वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कवीसंमेलन आणि समारोप असा कार्यक्रम असेल. ‘या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक संभाजीराजे यांचे कार्य समाजासमोर यावे, हा या संमेलनाचा उद्देश आहे’

शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणूक नियमबाह्य ! – औरंगाबाद खंडपिठाचा आदेश

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून राज्य सरकारने त्याविषयीचे शपथपत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत.

श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ व्याख्यानाचे आयोजन !

‘अक्षर ऊर्जा मर्म योग‘ या संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ या विषयावरील याख्यान १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘झूम’ प्रणालीवर आयोजित करण्यात आले आहे.

परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांचा केलेला साठा जप्त !

काळभोरनगर भागात ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २३ लाख ६० सहस्र ३०० रुपये किमतींचे रसायनसदृश ज्वलनशील द्रवपदार्थ जप्त केले.

पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

पिंपरी आणि पुणे येथील प्राधान्य मार्गावर मेट्रोच्या अपुर्‍या कामांसाठी निधी अल्प पडू नये; म्हणून ३६७ कोटी रुपये निधी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) प्रकल्पासाठी राज्य सरकारने दिला आहे. या प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा आहे.

१५ फेब्रुवारी हा ‘फास्ट टॅग’ सुविधेच्या मुदतवाढीचा अखेरचा दिनांक

वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे.

कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील महाविद्यालये चालू करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पहाता २२ फेब्रुवारीपर्यंत याविषयी आढावा घेऊन मगच मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई विद्यापिठाला पाठवले आहे.

इंजेक्शन मागे २१ पैसे अधिक घेतल्याने औषध विक्रेत्यास १४ वर्षांनंतर ४० सहस्र रुपयांचा न्यायालयाकडून दंड !

‘एखादा खटला १४ वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?’,

कणकवली शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या हद्दीत येणारी बांधकामे पाडली जाणार

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले असतांनाच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या हद्दीत येणारी (‘राईट ऑफ वे’च्या येणारी) बांधकामे काढण्याविषयी हालचाली गतीमान झाल्या आहेत.