पावसाळ्‍यामध्‍ये वातावरणात, तसेच शरिरात होणारे पालट

‘पावसाळा चालू झाल्‍यावर वातावरणात एकाएकी थंडावा निर्माण होतो. पावसाचे पाणी उंचावरून, वरच्‍या भागातून वाहून सखल भागांमध्‍ये येऊन साठते. या पाण्‍यामध्‍ये माती, तसेच अन्‍य प्रदूषित घटक मिसळलेले असतात. यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणातील या पालटांमुळे शरिरामध्‍ये वात आणि पित्त वाढतात.

पहिल्‍या पावसात भिजणे टाळावे

आजकाल वायूप्रदूषणामुळे पावसाच्‍या पाण्‍यात अनेक प्रदूषित घटक मिसळलेले असण्‍याची शक्‍यता असते. या प्रदूषित घटकांचा त्‍वचेवर अनिष्‍ट परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे पहिल्‍या पावसात भिजणे टाळायला हवे.’

पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.

अपचन – एक दुर्लक्षित आजार

अजीर्ण किंवा अपचन हे सर्वांच्‍या परिचयाचे आहे; परंतु या आजाराकडे क्षुल्लक म्‍हणून दुर्लक्ष केले जाते. आयुर्वेदामध्‍ये पचनशक्‍तीतील बिघाड हे अनेक आजारांचे मूलभूत कारण ठरते. म्‍हणून त्‍याविषयी आपण आजच्‍या लेखामध्‍ये सविस्‍तर जाणून घेणार आहोत….

विकतचे खाद्यपदार्थ खाण्‍यापेक्षा घरगुती पौष्‍टिक खाद्यपदार्थ खावेत !

बिस्‍किटे, शेव, चिवडा, चिप्‍स, फरसाण यांसारखे विकतचे तेलकट पदार्थ कधीतरी गंमत किंवा पालट म्‍हणून खाण्‍यास आडकाठी नसते; परंतु असे पदार्थ नियमितपणे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नसते. हे पदार्थ बनवण्‍यासाठी पामतेलासारख्‍या निकृष्‍ट तेलाचा वापर केला जातो. यांतून शरिराला काहीच पोषणमूल्‍य प्राप्‍त होत नाही.

कच्चे तेल खाणे चुकीचे

‘कच्चे खाद्य तेल अग्नी (पचनशक्ती) मंद करणारे असते. असे तेल नियमित खाल्ल्याने तोंड येणे, पित्ताचा त्रास होणे, अंगावर पुरळ येणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चटणीवर किंवा भातावर कच्चे तेल घालून खाऊ नये.

रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !

काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्‍हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्‍हणून दुपारी जेवल्‍यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्‍या दृष्‍टीने हानीकारक असते.

कृतज्ञता

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.

कोरड्या खोकल्‍यावर घरगुती उपचार !

एक वाटी कोणत्‍याही खाद्यतेलामध्‍ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हळद घालून हेे तेल एकदा गरम करावे. थंड झाल्‍यावर हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येत असेल, तेव्‍हा १ चमचा तेल प्‍यावे.