पावसाळ्यामध्ये वातावरणात, तसेच शरिरात होणारे पालट
‘पावसाळा चालू झाल्यावर वातावरणात एकाएकी थंडावा निर्माण होतो. पावसाचे पाणी उंचावरून, वरच्या भागातून वाहून सखल भागांमध्ये येऊन साठते. या पाण्यामध्ये माती, तसेच अन्य प्रदूषित घटक मिसळलेले असतात. यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणातील या पालटांमुळे शरिरामध्ये वात आणि पित्त वाढतात.