छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची विटंबना करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाईची मागणी !

कोल्हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) : कुंभोज येथे इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाचा फलक फाडून फेकून दिला. यानंतर जमलेल्या हिंदुत्वनिष्ठांसमोर ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया कशासाठी पडायचे ?’, असे उद्दामपणे विचारले. या संदर्भात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून विटंबना करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना दिले.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, कुंभोज येथील श्री. अजित देवमोरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु महासभेचे श्री. संदीप सासने, सर्वश्री विक्रम जरग, विजय चौगुले यांसह आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajit Devmore (@ajitdevmore)

निवेदनात म्हटले की, ही विटंबना हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवणार्‍या आणि अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची आहे. पुढील काळात देशविरोधी समाजकंटक आणि गुन्हेगार यांना १० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा करण्यात यावी, असा पालट कायद्यात करण्यात यावा.

२६ डिसेंबर या दिवशी हातकणंगले तालुक्यातील धर्मांध इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाचा फलक फाडून फेकून दिला होता. श्री. अजित देवमोरे यांच्या  तक्रारीवरून या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

संपादकीय भूमिका 

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा फलक काढून फेकणार्‍या धर्मांधांच्या विरोधात सर्वत्रचे शिवप्रेमी संघटित होतील का ?
  • अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?