तालिबानी आतंकवाद्यांनी गेल्या ४ वर्षांत पाकचे ४ सहस्र सैनिक मारले ! – Ishaq Dar

पाकचे उपपंतप्रधान इशाक डार यांचे विधान

पाकचे उपपंतप्रधान इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानला अतोनात हानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या ४ वर्षांत पाकिस्तानात ४ सहस्र सैनिक मारले गेले आहेत, तर २० सहस्रांहून अधिक घायाळ झाले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्ध होऊ नये, हे पाकिस्तानचे धोरण आहे. यासाठी तालिबानशी सातत्याने चर्चा केली; परंतु अद्याप सकारात्मक परिणाम मिळालेले नाहीत, असे विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी केले. त्यांनी तालिबानला आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

१. डार पुढे म्हणाले की, आम्हाला अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा बंद केल्याचा आनंद नाही; पण हे सुरक्षेच्या कारणांमुळे केले आहे. तालिबानचे बहुतेक सदस्य शांतता इच्छितात, पण काही जणांना हे मान्य नाही. अलीकडेच तालिबान सरकारने माहिती दिली आहे की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या शेकडो आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा :

    तालिबानकडून खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ‘इस्लामिक स्टेट’च्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण !

     पाकच्या अफगाणिस्तानवरील हवाई आक्रमणात १० नागरिकांचा मृत्यू


२. डार यांनी सांगितले की, पाकचे सैन्य गाझामध्ये आंतरराष्ट्रीय दलाला साहाय्य मदत करण्यास सिद्ध आहे. तथापि, यासाठी आधी भूमिका, नियम आणि अधिकार स्पष्ट असावेत. हमासला शस्त्रांपासून वेगळे करणे हे पॅलेस्टिनी कायद्याचे काम आहे, पाकिस्तान आणि इतर देशांनी यात हस्तक्षेप करू नये.

संपादकीय भूमिका

  • भारतात आतंकवादी कारवाया घडवून सहस्रावधी नागरिकांचा जीव घेणार्‍या पाकचे केवळ ४ सहस्र सैनिकच तालिबानी आतंकवादी ठार करत असतील, तर ते नगण्यच होय !
  • दुसर्‍याच्या घराला आग लावणार्‍याचे स्वतःचे घर जेव्हा जळू लागते, तेव्हा त्याला दुःखाची जाणीव होते, असे म्हटले जाते; मात्र पाकच्या संदर्भात असे काही होईल, अशीही अपेक्षा करता येत नाही !