दावणगेरे (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी !

  • २ वर्षांपूर्वी मिरवणुकीवर दगडफेक केल्यावरून पोलिसांचा ‘फतवा’

  • नेहमीच्या मार्गानेच मिरवणूक काढण्यावर हिंदू ठाम !

निषेध व्यक्त करण्यासाठी श्री गणेशमूर्तीवर घालण्यात आलेले काळे कापड

दावणगेरे (कर्नाटक) – येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात पालट करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठरलेल्या मार्गाऐवजी जुन्याच मार्गाने मिरवणूक काढण्याची संधी द्यावी, अशी स्थानिक आणि गणेश मंडळांच्या तरुणांनी मागणी केली आहे. या कारणामुळे विसर्जनासाठी निघालेली मिरवणूक रस्त्यातच थांबवण्यात आली. मिरवणूक २१ दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर काढण्यात येणार होती.

दावणगेरेच्या बसवराज पेठेत स्थापन करण्यात आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घेऊन जात असतांना हा वाद चालू झाला. यापूर्वी मिरवणूक ‘मदिना ऑटो स्टँड’ आणि ‘हंसबावी सर्कल’ या मुसलमानबहुल मार्गावरून जात असे; परंतु २ वर्षांपूर्वी याच मार्गावर दगडफेक झाल्यामुळे पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग रहित करून नवीन मार्ग निश्चित केला होता.

या वर्षीही पोलिसांनी निश्चित केलेल्या नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यास सांगितले; परंतु गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध केला. ‘आम्ही प्रतिवर्षी ज्या मार्गाने जातो, त्याच मार्गाने या वर्षीही जाऊ’, असा आग्रह मंडळाने धरला. या प्रसंगी हिंदु महिलांनीही पोलिसांसमोर हिंदूंची जोरदारपणे बाजू मांडली.

हिंदूंनी श्री गणेशमूर्तीच्या डोळ्यावर काळे कापड घालून केला निषेध !

जेव्हा पोलिसांचे मन वळवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले, तेव्हा गणेश मंडळांचे सदस्य आणि स्थानिक हिंदू यांनी राग व्यक्त करण्यासाठी श्री गणेशमूर्तीवर काळे कापड घातले. ‘पोलिसांनी जुन्या मार्गावरून जाण्यास अनुमती दिली नाही, तर आम्ही मिरवणूक काढणार नाही. आम्हाला मदिना ऑटो स्टँड आणि हंसबावी सर्कल यामार्गेच जाण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • आज देशातील केवळ काही भाग मुसलमानबहुल बनल्यावर हिंदूंना मिरवणूक काढण्यावर बंदी घातली जाते, भविष्यात देश मुसलमानबहुल बनल्यास हिंदूंना भारतात रहाण्यासच बंदी घातली जाईल ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्रच हवे !
  • कर्नाटक राज्य धर्मनिरपेक्ष असल्याचे स्वत: कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले असतांना मार्गावर दगडफेक झाली; म्हणून मिरवणुकीचा मार्ग पालटणे, ही धर्मनिरपेक्षतेची थट्टा आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यास पोलीस यंत्रणा सक्षम नसल्याचेही हे द्योतक आहे !
  • अशी बंदी घालायला दावणगेरे भारतात आहे कि पाकिस्तानात ?, असा प्रश्न पडतो. भारतात निर्माण झालेल्या अशा अनेक ठिकाणी हिंदूंना त्यांचे सणही साजरे करता येत नसतील, तर हे सरकार आणि हिंदू यांना लज्जस्पद म्हणावे लागेल !