Terrorists Returning To Their Camps : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जिहादी आतंकवादी पुन्हा तळांवर परतू लागले !

काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी करून मोठा घातपात करण्याची शक्यता !

महानिरीक्षक शशांक आनंद (उजवीकडे)

नवी देहली – भारताकडून नुकताच लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेला पाकिस्तान त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवण्यास सिद्ध नाही. सीमा सुरक्षा दलाच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुन्हा एकदा जिहादी आतंकवादी पाकव्याप्त काश्मीरमधील त्यांच्या तळांवर परतू लागले आहेत, तसेच प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून मोठा घातपात करू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. यामुळे सुरक्षायंत्रणा सतर्क झाल्या आहेत, अशी माहिती दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी दिली.

शशांक आनंद म्हणाले की,

१. आम्हाला सतत वेगवेगळ्या प्रकारची गोपनीय माहिती मिळत आहे. तथापि आतंकवादी कधी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील हे अद्याप कळलेले नाही; परंतु सुरक्षादल पूर्णपणे सज्ज आहेत.

२. शशांक आनंद यांनी १० मे या दिवशी पाकिस्तानने केलेल्या दुःसाहसाविषयी सांगितले की, पाकिस्तानने आमच्या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. सैनिक ते ड्रोन पाडण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी एका ड्रोनने बाँब टाकला, ज्यामध्ये आमचे उपनिरीक्षक महंमद इम्तियाज, शिपाई दीपक कुमार आणि भारतीय सैन्याचे नाईक सुनील कुमार यांचा मृत्यू झाला. सीमा सुरक्षा दलाने त्यांच्या २ चौक्यांना या सैनिकांची नावे देण्याचा आणि सांबा सेक्टरमधील एका चौकीला ‘सिंदूर’ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

३. यापूर्वी १३ मे या दिवशी ‘ऑपरेशन केलर’मध्ये भारतीय सैन्याने लष्कर-ए-तोयबाच्या ४ आतंकवाद्यांना ठार मारले होते. आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा सूड घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आतंकवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त केली, तरी आतंकवाद नष्ट झालेला नाही. पाकमध्ये आतंकवाद्यांची अनेक तळे आहेत आणि तेथे सहस्रो आतंकवादी प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद कधीही थांबणार नाही, ही वस्तूस्थिती आहे !
  • भारताने आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याची आणि मग त्यांना ठार करण्याची वाट पहाण्यापेक्षा आताच या तळांवर आक्रमण करून तेथील आतंकवाद्यांना ठार केले पाहिजे. ही प्रक्रिया सतत चालू राहिल्यावरच आतंकवाद्यांवर वचक बसेल !