कायदेशीर गोष्टी पडताळून अतिक्रमणांवर योग्य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

पंढरपूर – केवळ विशाळगडच नाही, तर राज्यातील सर्वच गड हे अतिक्रमणमुक्त असले पाहिजेत, त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्टी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल. या संदर्भात माझे छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.