मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी घोषित झालेली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अर्ज प्रविष्ट केलेल्या मुख्य उमेदवारांपैकी एकानेही माघार न घेतल्यामुळे १२ जुलै या दिवशी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण १२ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी एकूण १४ अर्ज प्रविष्ट झाले होते. पैकी अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगर या अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले. ५ जुलै या दिवशी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक होता. उर्वरित १२ पैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे १२ जुलैला सकाळी १० ते ५ या वेळेत विधान भवन, मुंबई येथे मतदान प्रक्रिया पार पडेल.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात
नूतन लेख
झोपेची गोळी न दिल्याने औषध विक्रेत्याला तरुणांकडून रॉडने मारहाण
गर्दीमुळे पडल्यावर लोकल अंगावरून गेल्याने पाय गमावले
राज्यात ८ सहस्र ८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव ! – अदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री
आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ !
पुणे शहरातील १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित !
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेकडून ६४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार !